Gajlaxmi.

Gajlaxmi.

The argument in favor of using filler text goes something like this: If you use any real content in the Consulting Process anytime you reach.

  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img

Get In Touch

या ग्रंथातील प्रत्येक अध्यायात संस्कारक्षम समाज निर्माण कसा होईल याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. सनातन भारतीय संस्कृतीतील विविध पुराणे यासाठी संदर्भ म्हणून घेतलेली असून जी आजसुद्धा समाजासाठी सुविख्यात आहेत. यातील बोधात्मक कथा सांगून आजच्या मानवाने त्यातून बोध घेऊन आपले जीवन डोळसपणे जगावे, विवेक आणि नीतीमूल्य स्वतःमध्ये वृध्दिंगत करून जगावे असा प्रामाणिक हेतू या ग्रंथ निर्मितीबाबत लेखकाचा आहे.

हा ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी, तेलगू व गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणे हा ग्रंथ डिजिटल म्हणजेच मराठी व हिंदी भाषेत ऑडियो स्वरूपात देखील गजलक्ष्मी एपिके वर उपलब्ध आहे.

मनुष्यप्राणी आपल्या नीतिमूल्यांकडे थोडेसे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून येऊ लागले. त्याला आपल्या संस्कृतीने सांगितलेल्या कित्येक गोष्टीत अंधश्रद्धा जाणवू लागली.

तो सर्वच गोष्टींवर अंधश्रद्धेचा छाप मारू लागला व पूर्णतः नास्तिक बनला तर काही वर्षांनी पूर्णतः समाज रचनाच बदलेल.

त्याच्या अहंकारामुळे तो संस्कृतीला थोतांड समजून संस्कृतीने सांगितलेल्या आचार धर्माला सरळ सरळ अंधश्रद्धा म्हणून तिची खिल्ली उडवून तिच्याकडे डोळे झाक करत आहे. त्याच्या या कृतीमुळे तो आपल्या भावी पिढीला एक वाईट संदेश देत आहे.

याच्या दुष्परिणामांना त्याला सामोरे जावे लागणारच आहे. परंतु त्याला वेळीच जागृत करणे हे संतांचे काम असल्याने जागृतीच्या उद्देशाने त्याला संस्कृतीतील श्रद्धा, त्यामागील तत्वज्ञान,श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक या गोष्टी नीट कळाव्यात या उद्देशाने जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी "भेद अंधश्रद्धांचा" या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

हे पुस्तक मराठी, हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

जीवपण सोडून देवपण अंगीकारणे हाच जीवाचा धर्म आहे. जीवाला जरी अंगभूत धर्म नसला तरी तो स्वतः ब्रम्हच आहे. ब्रम्हमय होणे हाच त्याचा विश्वधर्म आहे.

परंतु मायेमध्ये गुंतल्याने तो स्वस्वरुपास विसरत आहे. जीवन सफल होण्याकरिता ब्रह्म म्हणजे काय? माया म्हणजे काय? आत्मा, परमात्म्याचे अनुसंधान, आत्म्याचे अमरत्व इत्यादी गोष्टींचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे निर्भयता प्राप्त होऊन आत्मबुद्धीचा विकास घडून जीवाचा उद्धार होतो.

जीवनयात्रा या पुस्तकात जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी ब्रम्ह, महामाया, नरदेह, सदगुरु, भक्ती, मुक्ती, मृत्यू. आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म इत्यादी विषय अत्यंत सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडले आहेत.

जीवनयात्रा हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी उभा भाषेत उपलब्ध आहे.

हे पुस्तक मराठी, हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

नुसती श्रद्धा ठेवून आपल्याला आपल्या धर्माचे पूर्णतः आचरण करता येणार नाही.

स्थल, काल, परिस्थिती विचारात ठेवून सद्यस्थितीत आपण कसे जगले पाहिजे हा विचार या पुस्तकात जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी मांडला आहे.

आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात बराच संकुचितपणा आलेला आहे. हिंदुधर्मातला मूळचा शहाणपणा विसरलो आहोत. हिंदुधर्मीय त्यांनाच संबोधले जाते, जे हिंदुधर्माच्या श्रुतींनी सांगितल्याप्रमाणे वागतात. सत्य, प्रेम, श्रद्धा, त्याग हा हिंदुधर्माचा गाभा आहे.

त्याला अनुसरून सांप्रतकाळी कसे वागावे हे या पुस्तकातून जगदगुरुश्रींनी सांगितले आहे.

"स्वधर्म" या नावातच मानवी जीवनाचा सर्वसमावेशक "अर्थ" दडलेला आहे. स्वधर्म म्हणजेच जीवाने स्वतःच्या स्वरूपात स्वतःला पाहणे. प्रत्येक जीवाने सदगुरु कृपा संपादन करून, मानवी जन्माचा शोध घेणे हेच त्याचे इतिकर्तव्य आहे. संसारिक खस्ता खाणारा प्राणी, योग्य प्रकारचे "सदगुरु" न मिळाल्यामुळे किवा परमार्थाच्या शोधात न लागल्यामुळे किंवा योग्य गुरु मिळून त्यांची आज्ञा न पाळल्याने, स्वधर्मापासून दूर, अगदी दूर कसा फेकला जातो याचे सुंदर सार जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी या पुस्तकात सांगितले आहे.

परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधकाने चालत्या बोलत्या सदगुरुरूपी परमेश्वराला भजन, पूजन, नामसंकीर्तनाने प्रसन्न करून घ्यावे. असे केल्याने सदगुरूंप्रती अतीव प्रेम निर्माण होवून दृढभाव निर्माण होतो. त्याचे परिणाम नीतिवर्धकच होतात. या उद्देशाने या पुस्तीकेतील आरत्या, अभंग आहेत.

सदर पुस्तकातून जगदगुरुश्रींनी त्यांचे उपास्य दैवत संतशिरोमणी गजानन महाराज व सदगुरु प.पु. काडसिद्धेश्वर महाराज यांच्यावर रचलेल्या आरत्या, अभंग व हरिपाठ देखील प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

सदरचे ग्रंथ पुष्प मराठी भाषेत उपलब्ध असून यातील आरत्या व काही भजने, हरिपाठ हे डिजिटल स्वरूपात म्हणजेच गजलक्ष्मी एपिकेमध्ये ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. आपण गजलक्ष्मी एपिके डाउनलोड करून सबस्क्रिपशन फी भरून त्याचा आनंद घेऊ शकता.

गजलक्ष्मी एपिके डाउनलोड करण्याकरिता लिंकवर क्लिक करा : Link

स्वस्वरूप संप्रदाय मध्ये उपासक दीक्षा, साधक दीक्षा व शिष्य दीक्षा अशी ३ प्रकारे दीक्षा दिली जाते. प्रपंच करता करता ज्यांना परमार्थ करायचा आहे अशा भाविकांना जगद्गुरुश्री उपासक दीक्षा देतात. ही उपासक दीक्षा घेतल्यानंतर 1 वर्षांनी त्या पारमार्थिकाला साधक दीक्षा घेता येते व साधक दीक्षा घेवून 2 वर्षांनी साधकाला शिष्य दीक्षा घेता येते.

उपासक दीक्षा घेतल्यानंतर दैनिक, साप्ताहिक, वार्षिक साधना कशी करावी, दीक्षेचे नियम याबाबतची संपूर्ण माहिती जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी "उपासक दीक्षा" या पुस्तकात दिली आहे.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी व तेलगू भाषेत उपलब्ध आहे.

हल्लीच्या जीवनात अनेकजण येनकेन प्रकारे भगवंताची उपासना आपापल्या परिने करीत असतात. प्रत्येक जीवाचा हेतू वेगवेगळा असतो, परंतु भगवदभक्ती ही काय केवळ ऐहिक सुखदुःख दृष्टिसमोर ठेवून करायची असते का? जीवनात सुखदुःखे येतातच का? व त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर आपण परिणाम का करुन घेतो? या सर्व गोष्टींचा बहुतेक कोणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. यासाठी मानवाचे जीवन नेमके काय आहे? हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनाचा अर्थ जर आपण नीट समजून घेतला तरच त्यायोगे येणारे सुखदुःख यांचा योग्य परामर्श घेऊन जीवन सुसहय व आनंददायी होईल.

त्याचदृष्टीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांनी जीवन रहस्य या पुस्तकामध्ये अत्यंत उत्कृष्ट व अत्यंत सोप्या भाषाशैलीत मानवी जीवनाचे रहस्य वर्णन केले आहे.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

स्वस्वरुप संप्रदायाचा नामसप्ताह सोहळा कसा असावा?

त्याची साहित्यसह मांडणी कशी असावी? याबाबतची सविस्तर माहिती जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे.

जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज लिखित "आत्मानंदाच्या शोधात" हे पुस्तक म्हणजे परमार्थाची तळमळ लागलेल्या साधकासाठी, चातक पक्षाला ज्याप्रमाणे कार्तिक महिन्यात मोती मिळावा त्याप्रमाणे मिळालेला उपदेशच आहे.

हे पुस्तक अनुग्रह घेवून स्वस्वरूपाची ओळख करून घेवू इच्छिणाऱ्या सर्व साधकांनी मनापासून वाचावे, त्याचे चिंतन करावे आणि मगच आपण कोणत्या संप्रदायाच्या शाखेतून अनुग्रह घ्यायचा हे निश्चित करावे.

जीवनामध्ये सदगुरुंची गरज का आहे ? कोणी कोणाला अनुग्रह देवू नये किंवा अनुग्रह घेवू नये? अनुग्रह देण्याचा व घेण्याचा अधिकार कोणाला आहे? अनुग्रह घेण्यापूर्वी ते अधिकारी सत्पुरुष आहेत का? अध्यात्मात नेमक्या शाखा किती आहेत?

आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्या शाखेचा अनुग्रह घेणे उचित ठरेल? स्व-स्वरूप संप्रदाय म्हणजे काय? या संप्रदायाची गुरुपरंपरा कशी आहे? या संप्रदायातील साधना कशाप्रकारची आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जगदगुरुश्रींनी या पुस्तकात विस्तृतपणे दिलेली आहेत.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून मुक्ती मिळविण्याचे सामर्थ्य फक्त माणसातच आहे, असे वारंवार धर्मग्रंथ, शास्त्र आपणास बजावत आहेत.

अशाप्रकारचा बदल होण्याकरिता अध्यात्मातील कोणताही एक मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. योगमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग हे ते चार मार्ग असून या मार्गांच्या साधना साधकाला निश्चित माहीत असणे आवश्यक आहे.

जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी "मुक्तीचे राजमार्ग" या पुस्तकामध्ये जीवन ध्येय, काल महिमा, शरीर रचना, उपसंहार व उपासनेच्या चार मार्गांची विस्तृत माहीती दिलेली आहे.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

आत्मज्ञान किंवा स्वस्वरूप ज्ञात झाल्याशिवाय जन्ममरण तथा सुखदुःखाचे वर्म हाती येणार नाही. भौतिक विज्ञान जरी असले तरी त्यामुळे जन्ममरण संपणार नाही किंवा सुख - दुःख नष्ट होणार नाहीत.

म्हणून आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. प्रस्तुत आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी जीवाला तगमग, तळमळ निर्माण झाली पाहिजे. अशा उच्च स्थितीप्रत पोहोचण्यासाठी गुरु व शिष्य हि महत्त्वाची नाती एकमेकांना आधारभूत ठरतात.

एकमेकांना प्रेमाने, धैर्याने, शिस्तीने जाण्याचे अनुशासन या संबंधातून प्राप्त होते. याच अनुषंगाने जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी "भवसागरातील दीपस्तंभ" हा ग्रंथाची निर्मिती केली.

आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीस अनुसरून कोणतीही अतिशयोक्ती न करता किंवा विपर्यस्त न लिहिता यथोचित जीवाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आचारधर्म, अध्यात्माची तळमळ, उपासना, व्यवहार, शरीरतादात्म्य, ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता, नामस्मरण हे विषय संकलित केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक साधकाच्या जीवनात नक्कीच दीपस्तंभ म्हणून उपयोगी पडेल.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी, कन्नड व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

एखाद्या आराध्य दैवताचे स्तुतीपर भजन म्हणजे स्तोत्र होय. असे स्तोत्र जेव्हा रोज नियमितपणे म्हटले जाते तेव्हा त्यास "नित्यस्तोत्र" असे म्हणतात.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज लिखित ग्रंथ म्हणजे श्री लीलामृत. याच श्री लीलामृत ग्रंथातील कथांचे सार जगदगुरुश्रींनी स्तोत्र स्वरूपात "नित्य स्तोत्र" या पुस्तकात लिहिले आहे.

नित्यस्तोत्र पठनाने वाचाशुद्धी, भाषाशुद्धी होतेच त्याचप्रमाणे मन:शांतीचा लाभ, भयनिवारण, धनधान्य संपन्नता, नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण, आत्मविश्वास व धैर्य देखील प्राप्त होते.

सदरचे ग्रंथपुष्प मराठी भाषेत उपलब्ध असून डिजिटल स्वरूपात म्हणजेच गजलक्ष्मी एपिकेमध्ये ऑडियो स्वरूपात देखील उपलब्ध आहे.

गजलक्ष्मी एपिके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Link

आजची इवलीशी चिमुकली बालके समाजाचे प्रमुख म्हणून कार्य करत असताना ते जर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी, स्वतंत्रसेनानी सुभाषचंद्र बोस आदी मान्यवर विभूती बनायला हव्या असतील तर ही बालमने सुसंस्कारित करण्याची आवश्यकता आहे.

मातृभक्त, पितृभक्त बनले नाही तर पाश्चिमात्य देशासारखी परकेपणाची जाणीव आपल्याला होत राहील आणि पश्चातापाखेरीज अन्य उपाय आपल्या हाती असणार नाही.

या देवांच्या लेकरांना सुसंस्कारित करण्याच्या इराद्याने जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी हे "बालामृत" साकार केले आहे.

जगदगुरुश्रींचा यामध्ये केवळ भक्ती घडावी हाच नुसता उद्देश नसून त्याने कसे वागावे? कसे जगावे? कसे राहावे? मनाची व्यापकता, शरीराची लिनता, बुद्धीची शालीनता जोपासणे हे आहे.

वयाच्या १६ वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींनी दररोज एकदा, स्नान केल्यानंतर या बालमृताचे, गोड आवाजात सुस्वर वाचन करावे. यामुळे आपल्या वाणीत माधुर्य व शुद्धता येईल.

सदर बालामृत ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचे पादुका पूजन सोहळे संपन्न होत असतात.

या सोहळ्यामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य, त्याची मांडणी, आरती यांची माहिती या पुस्तकांमध्ये दिली आहे.

हिंदू धर्मीय लोक सर्रासपणे अन्य संस्कृतीचे आपल्या घरी-दारी, अवती-भवती आचरण करताना दिसतात. आपली महान संस्कृती, धर्मसंस्कार विसरून अन्य संस्कृतीच्या, संस्काराच्या प्रेमात पडल्यामुळे या भारत देशात सुद्धा हिंदू परका व पोरका झाला आहे. हि अवस्था अशीच राहिली तर येत्या काही काळात संपूर्ण विश्वातून हिंदू धर्म हद्दपार झाल्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला नाही आले तर मिळवले.

हिंदू धर्माला आज राजाश्रयाची गरज आहे. राजाश्रय त्याचवेळी मिळतो ज्यावेळी संघशक्ती एकवटलेली असते. जोपर्यंत आपण संघटित नाही तोपर्यंत आपल्यातील जातीभेद, गरीब - श्रीमंत अशा हानिकारक गोष्टी आपल्यातून जाणे कदापि शक्य नाही. यावर उपाय एकच तो म्हणजे भगवंताच्या नामाची सामुदायिक उपासना.

आपला हिंदू धर्म अनेक संप्रदायांमध्ये विखुरला गेला आहे. त्यामुळे तो एकत्र यावयास हवा असेल तर आपण शैव-वैष्णवांना प्रिय असणारा ओमकार स्वरूप परमात्मा आपल्या हृदयात साठविला पाहिजे. याकरिता सर्व जातीपंथातील हिंदू स्त्री-पुरुषांनी, आबालवृद्धांनी एकत्र येवून, त्या भक्तप्रतिपालक, दिनदयाळू परमात्म्याची धर्मसंस्कार कार्यक्रमातून भक्ती, उपासना करतात.

धर्मसंस्कार या पुस्तकात जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी दर आठवड्याला होणारा हा धर्मसंस्कार कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करावा त्याबाबतची नियमावली, कार्यक्रमात म्हटले जाणारे अभंग, गीत, श्लोक याबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे.

हे पुस्तक मराठी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचे निरनिराळ्या ठिकाणी अध्यात्मिक दृष्टिकोनातून जनप्रबोधन प्रवचन कार्यक्रम आयोजित केले जातात.

परमार्थ, सद्गुरु, शिष्य, नरदेह, भक्ती, भक्तीचे प्रकार, अंधश्रद्धा, समर्पण, सद्गुरु, निती, वैराग्य इ विविध आध्यात्मिक विषयांवरील सुबोध प्रवचनाचे संकलन म्हणजे "प्रवचन सिंधू भाग १ व भाग २" हे पुस्तक.

अध्यात्म जनसामान्यांना सहज करावे व ते त्यांच्या पचनी पडावे इतकी या पुस्तकातील भाषा सोपी व सुबोध आहे.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्य संदेशांचा संग्रह म्हणजे अमृतवाणी.

सदरचे पुस्तक मराठी, हिंदी व कन्नड भाषेत उपलब्ध आहे.

मानवतेची दिव्य ज्योत मनुष्याच्या मनात सदैव प्रज्वलित राहावी, तो मानसिक दृष्ट्या सदैव खंबीर राहावा, अध्यात्म, विज्ञान व व्यवहार यांची सांगड घालून मनुष्याने आपले जीवन कसे जगावे याबाबतचे विचार त्यांना तात्काळ उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी ब्रह्मस्फुरण या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.

सदरचे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध आहे.

हिंदू धर्माच्या सद्यस्थितीचे वर्णन तसेच धर्मरक्षणाच्या उदात्त कार्यात स्वतः सहभागी होण्याची प्रेरणा कशी मिळते याचे वर्णन जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांनी या पुस्तकांमध्ये केले आहे.

सदरचे पुस्तक मराठी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.